क्राईम

तीन लहान मुलांसह विवाहित महिला बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत

कळवा येथील मारुती मंदिर परिसरातून अचानक निघून गेल्याची घटना; शोधासाठी नागरिकांना आवाहन

तीन लहान मुलांसह विवाहित महिला बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत

कळवा येथील मारुती मंदिर परिसरातून अचानक निघून गेल्याची घटना; शोधासाठी नागरिकांना आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) :- ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका विवाहित महिलेसह तिची तीन लहान मुले बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील काणेकर यांची पत्नी सौ. लक्ष्मी सुनील काणेकर (वय अंदाजे २५ वर्षे) या दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कळवा येथील विष्णुनगर, डिगा परिसरातील मारुती मंदिराजवळील घरातून कुणालाही न सांगता बाहेर पडल्या. त्यांच्यासोबत त्यांची तीन लहान मुलेही होती.

बेपत्ता झालेल्या महिलेसोबत सौरभ (वय ५ वर्षे), विक्रम (वय २ वर्षे) आणि संस्कृती (वय ७ वर्षे) ही मुले असल्याने ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे.

महिलेचे वर्णन असे की, उंची अंदाजे ५ फूट, सावळा रंग, अंगाने सडपातळ अशी आहे. अचानक घरातून निघून गेल्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय अत्यंत चिंताग्रस्त झाले आहेत.

कुटुंबीयांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनातील महिला व तिची मुले कुठेही आढळल्यास त्वरित खालील संपर्क क्रमांकांवर माहिती द्यावी.

*संपर्क क्रमांक*

सुनील काणेकर ८४५१०६११०७

गणपती काणेकर ९८९२३८८०४५

अंशु काणेकर ९१३६९९०५९६

संतोष सोनकांबळे ८८३०८०७१३४

ही घटना लक्षात घेता स्थानिक नागरिकांनीही सतर्क राहून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी वाचून पुढे फॉरवर्ड करा..

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!