महाराष्ट्र

२९-३० जानेवारी शासकीय कार्यालये बंद की सुरू? शासनाने दिला स्पष्ट इशारा

२९-३० जानेवारी शासकीय कार्यालये बंद की सुरू? शासनाने
दिला स्पष्ट इशारा

मुंबई:- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य शासनाने अधिकृतरीत्या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर निधनाच्या दिवशी, म्हणजे दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली होती.

मात्र, या दुखवट्याबाबत सोशल मीडियावर सलग तीन दिवस सुट्टी असल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, हे संदेश चुकीचे, अफवाजन्य आणि नागरिकांची दिशाभूल करणारे असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

शासनाच्या अधिकृत माहितीनुसार, दि. २९ आणि ३० जानेवारी २०२६ रोजी
* सर्व शासकीय कार्यालये
* शाळा, महाविद्यालये
* शासकीय व निमशासकीय आस्थापना
या नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

दुखवटा म्हणजे शोक व्यक्त करण्याचा अधिकृत कालावधी असला तरी, त्याचा अर्थ सर्व दिवस सुट्टी असा होत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी, पालकांनी आणि कर्मचारी वर्गाने सोशल मीडियावरील अप्रामाणिक संदेशांवर विश्वास न ठेवता केवळ शासनाच्या अधिकृत सूचनांनाच महत्त्व द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवले असून, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे प्रशासनाच्या कामकाजात अडथळे निर्माण होऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!