पुन्हा लॉकडाऊन? राज्यात खळबळ… मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा – अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल | व्हिडिओ पहा

पुन्हा लॉकडाऊन? राज्यात खळबळ… मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा – अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल | व्हिडिओ पहा
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर माध्यमांवर “पुन्हा लॉकडाऊन लागणार” अशा संदेशांचा पाऊस पडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, लॉकडाऊन संदर्भात खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. काही असामाजिक घटक जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहेत. यामुळे जनतेमध्ये घबराट निर्माण होत असून प्रशासनाच्या कामात अडथळा येत आहे.
सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये. अधिकृत माहिती फक्त शासनाच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर आयटी कायदा व इतर फौजदारी कलमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काही भागांमध्ये या अफवांमुळे किराणा दुकाने, पेट्रोल पंप आणि बाजारपेठांमध्ये अनावश्यक गर्दी झाल्याचेही दिसून आले. प्रशासनाने अशा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
लॉकडाऊनबाबत कोणताही अधिकृत निर्णय नसताना अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर सरकार आता कठोर भूमिका घेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून फक्त अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



